लोकमान्य टिळक यांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली.
*१२ मे १९४६*
बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसंदर्भात ठराव संमत करण्यात आला.
*२८ जुलै १९४६*
महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये मराठी भाषिक प्रांत निर्माण करण्याबद्दल ठराव संमत करण्यात आला.
*१७ जून १९४७*
भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भामध्ये 'दार कमिशन'ची स्थापना करण्यात आली.
*१० डिसें. १९४८*
दार कमिशनने अहवाल प्रसिद्ध केला. दार कमिशन कडून भाषावार प्रांतरचना अमान्य करण्यात आली.
*२९ डिसें. १९४८*
: जे. व्ही. पी. समितीची स्थापना करण्यात आली.
*२८ सप्टें. १९५३*
:नागपूर करार झाला.
*१० ऑक्टो. १९५५*
: फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. राज्याचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस करण्यात आल
२९ डिसें. १९५३
: फाजल अली कमिशनची (राज्य पुनर्रचना आयोग) स्थापना करण्यात आली.
*७ नोव्हें. १९५५*
:मुंबईमध्ये कामगारांची सभा भरवण्यात आली. यात सर्वपक्ष सहभागी झाले होते.
*८ नोव्हें. १९५५*
:या दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीने त्रिराज्याचा ठराव संमत केला.
*१८ नोव्हें. १९५५*
: सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला.
*२१ नोव्हें. १९५५*
: एक दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात आला होता. तर बंदी आदेश मोडल्याने गोळीबार करण्यात आला यात १५ जण हुतात्मे झाले.
*१६ जाने. १९५६*
: मुंबई केंद्रशासित करण्याची पं. नेहरूं यांच्या कडून घोषणा त्यामुळे प्रचंड जनआंदोलन करण्यात आले. येथील गोळीबारात ९९ हुतात्मे झाले.
*६ फेब्रु. १९५६*
: संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
*७ ऑगस्ट १९५६*
: या दिवशी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा संमत केला.
*१ नोव्हें. १९५६*
: या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वामध्ये आले.
*इ. स. १९५७*
: लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र
समितीला मोठे यश मिळाले.
*३० नोव्हें. १९५७*
: संयुक्त महाराष्ट्र समितीकडून प्रतापगड येथे मोर्चा काढण्यात आला तर समितीकडून पं. नेहरूविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
*एप्रिल १९६०*
: संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला.
*1 मे 1960*
: मुंबई, मराठवाडा, विदर्भ यांच्यासह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.