बॉलिवूड तसेच साउथ ॲक्शन स्टार , प्रेक्षकांचा लाडका नागा चैतन्य आणि सुपरस्टार सामंथा या हीट कपल चा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. काही मतभेदांमुळे ते वेगळे झाले असे सांगितले जात आहे. पण आता नागा चैतन्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सामंथा हिने तिच्या अभिनयाने सर्व चाहत्यांना वेड लावले आहे. सामंथा आणि नागा चैतन्य हे कूल कपल म्हणून ओळखले जात होते. पण 2 ऑक्टोंबर रोजी यांचा घटस्पोट झाला.
काय आहे चैतन्याचे निर्णय?
नागा चैतन्य ने सामंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर एक नवीन घर खरेदी केले. आता तो आपल्या वडिलांच्या घरात राहणार नाही. चैतन्याचे नवे अपार्टमेंट हैदराबाद मधील 'जुबली हिल्स 'या परिसरात आहे. सध्या त्या घराचे नूतनीकरण केले जात आहे. त्यानंतर चैतन्य तेथे स्थलांतरित होणार आहे.
वाचा: Ramayan या Movie मध्ये हृतिक रोशन आणि रणबीर कपूर, मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!
घटस्फोटानंतर नागा चैतन्य प्रथमच एका कार्यक्रमात हजर झाला होता. अभिनेत्री पूजा हेगडे आणि त्याचा भाऊ अखिल यांच्यासोबत आपल्या आगामी चित्रपट मोस्ट एलिजिबल बॅचलर या प्रमोशनच्या कार्यक्रमात तो सहभागी होता. त्या कार्यक्रमात तो खूपच शांत आणि उदास दिसून आला.
सामंथा चे हे आहे मत !
घटस्फोट ही गोष्ट खूप वेदनादायी आहे. महिलांचे काही प्रकरण असेल तर तिच्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु एक समाज म्हणून आपण पुरुषांच्या नैतिकतेवर कधीच प्रश्न उपस्थित करत नाही, असे तिने सोशल मीडियावर जोरदार प्रत्युत्तर केले. पसरविल्या जाणाऱ्या अनेक अफवा ना तिने खडसोर उत्तर देऊन तिने तिची बाजू मांडली.
इंस्टाग्राम, ट्विटर वर पोस्ट करण्यात आलेल्या निवेदनात सामंथा म्हणाली," सतत वैयक्तिक टीका होत असल्याने प्रक्रिया आणखीनच कठीण झाली आहे."
या दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण सामंथा आणि नागा चैतन्यने घटस्फोटा नंतर देखील ते दोघेही चांगले मित्र राहणार असल्याचे सांगितले आहे.
वाचा:मालिकेत रंगला नवरात्रीबद्दल भोंडल्याचा खेळ- आई कुठे काय करते
बिग बी अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी 'एवढे' घेतले होते मानधन.