झी मराठीवरील 'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना आता खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेल्या वळणांवर प्रेक्षक खूप प्रतिसाद देऊन मालिकेला सपोर्ट करत आहेत. सध्या मालिकेत अरुंधती एका मोठ्या अडचणीत सापडली आहे तरी संजना याचाच फायदा घेऊन अरुंधतीला जाब विचारत आहे.
मालिका आता एका रंजक वळणावर आली असून प्रेक्षकही येणाऱ्या भागांसाठी खूप उत्सुक झाले आहेत.या येणाऱ्या भागात मालिकेमध्ये अजून एका विशेष व्यक्तीची एन्ट्री होणार असल्याचे समजले आहे.
समृद्धी घराबाबत घेतलेल्या अरुंधती च्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब नाराज आहे.
सध्या समृद्धी घराबाबत घेतलेल्या अरुंधती च्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब नाराज आहे. या मालिकेत यशच्या शॉर्ट फिल्मला नॉमिनेशन मिळाल्यामुळे ते लंडनला निघाला आहे. तर दुसरीकडे अविनाशची पैशांची अडचण सोडवण्यासाठी अरुंधतीने अप्पांच्या मदतीने समृद्दीमधील अरुंधतीचा हिस्सा तारण ठेवत पैसा गोळा केला. आणि अविनाशची अडचण दूर केली. याबाबत कुणालाच माहिती नव्हती.परंतु यशने जेव्हा गौरीला हे सांगताना संजनाने ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात सर्वांसमोर उघडकीस आणले . त्यामुळे सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या सर्वांच्या प्रश्नाला अरुंधती कशी सामोरी जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अरुंधतीने जो निर्णय घेतला आहे, तो कांचन, अनिरुद्ध यांना मान्य होईल का, या परिस्थितीचा संजना फायदा घेत तिचा स्वार्थ साधणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल . अरुंधती हे सर्व अविनाश भाऊजींसाठी करत असते. हे सर्व सत्य समोर आल्यावर नेमके काय होणार हे आगामी भागांमध्ये कळणार आहे.
मालिकेत नव्या एका कलाकाराचे इंट्री :
अविनाशला मदत करण्याच्या नादात अरुंधती अडचणीत सापडलेली असताना मालिकेच्या येणाऱ्या भागात आणखी एक धक्कादायक वळण येणार आहे.मालिकेत अरुंधतीच्या एका मित्राची एंट्री होणार आहे. अरुंधतीच्या या मित्राची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत अद्याप काही खुलासा झालेला नाही. परंतु ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत असल्याची जोरदार चर्चा आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात येणारा हा नवीन मित्र वादळ घेऊन येतो की तिला आधार देतो. हे मालिकेच्या आगामी भागांतून पहायला मिळेल. दरम्यान, अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या मित्राची एंट्री होणार असल्याने अनिरुद्धची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.