स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाणारी ' आई कुठे काय करते' प्रेक्षकांना खूपच रोमांचक आणि मनोरंजक ट्विस्ट घेऊन येत असते. या मालिकांमध्ये आता अनिरुद्ध आणि संजना यांची लग्नाची आगळीवेगळी तयारी केली जात त्यातच आपल्या हुशार नेटकर यांनी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे म्हणजेच अनिरुद्ध संजना यांच्या लग्नाची पत्रिका आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे जी खूपच विनोदी आहे. पटणारी पण विचित्र भाषा या कॉम्बो मुळे लग्नपत्रिका खूप गाजलेली दिसत आहे.
🔥अनिरुद्ध (अन्या)आणि संजनाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर होत आहे वायरल.
छोट्या पडद्यावरील खूप लोकप्रिय असलेली मालिका आई कुठे काय करते. परत प्रेक्षकांच्या उत्सुकतेला वाव मिळणारी मालिका ठरत आहे. प्रेक्षकांचा सध्या अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाचा घाट घातलेला असून तो खूपच चर्चेच्या विषय ठरत आहे. कारण हे ट्विस्ट खूप न पटणारे आहे पण त्याच प्रमाणे मनोरंजक आणि उत्सुकतेची लाट घेऊन येत आहे. काही दिवसा पूर्वीच अरुंधती आणि अनिरुद्ध घटस्फोट झाला आहे पण संजनाला अनिरुद्ध सोबत लग्न करण्याची इतकी काय झाली की तिने लगेच काही दिवसानंतर चा मुहूर्त देखील काढला आता हे लग्न होणार की नाही हे तर कळेलच पण आपले सोशल मीडियावर अनिरुद्ध आणि संजना च्या लग्नपत्रिका व्हायरल करून मजा घेत आहेत.
ही पत्रिका एका युझरने तयार केली असून मीम म्हणून ही पत्रिका सगळ्याचं नेटकऱ्यांना पसंत पडते आहे. पत्रिकेत लिहिलेला मजकूर वाचून तर सगळ्यांची हसून हसून पुरेे झाली आहे.
पत्रिकेत लिहिलं आहे, चि. अनिरुद्ध (उर्फ आन्या) आणि चि. सौ. का. संजना यांचा शुभ विवाह आई कांचन यांची प्रकृती स्थिर असेल तेव्हा करण्याचे योजिले आहे.
विवाह स्थळ- संजना ठरवेल तिथे तर विवाह मुहूर्त- शेखर यायच्या आत देण्यात आला आहे. आपले नम्रमध्ये सौ. कांचन देशमुख आणि विनायक देशमुख यांची नावं लिहिली असून सन्माननीय उपस्थिती अरुंधती देशमुख हिची असणार आहे. यासोबत अरुंधती एक भावुक गीतही गाणार आहे.
छोट्या निमंत्रकांमध्ये निखिल, निहार, मिनू, अबोली यांची नावं आहेत तर मानाची करवली म्हणून विशाखा मिरवणार आहे. इतकंच नाही तर यश, इशा आणि अभिषेक यांच्या नावासोबत आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं असंही लिहिण्यात आलं आहे. ही आगळी वेगळी पत्रिका पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. या भन्नाट पत्रिकेवर नेटकऱ्यांच्याही तितक्याच उस्फुर्त प्रतिक्रिया येत आहेत. पत्रिकेमधील विवाह मुहूर्त अनेक नेटकऱ्यांच्या कौतुकाचं कारण ठरला आहे.