साउथ चा ॲक्शन हिरो नागा चैतन्य आणि चाहत्यांची आवडती क्वीन अभिनेत्री समंथा हे दोघे सर्वात हिट कपल म्हणून ओळखलं जात होतं. पण काही कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्पोट झाला.दोघेही डिवोर्स घेत असताना खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन आपापसातील भांडणे कायमची सोडवली. चार वर्षांच्या वैवाहिक नात्याला संपवत दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना कल्पना दिली होती. सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांसाठी खूपच वेदनादायक बातमी ठरली. पण त्या दोघांचा निर्णय पक्का असल्याने ते शेवटी विभक्त झाले.
मित्रांनो! सध्या एक बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. समंथा ने घटस्फोट नंतर एक विचित्र कृत्य केले. ते पाहून चाहते गोंधळात पडले आहे. समंथा ने घटस्फोट नंतर तिच्या सोशल मीडियावर असलेल्या सर्व अकाउंटवर असणारे फोटोज डिलीट केले. त्यांच्या लग्नातील काही फोटो तिच्या पोस्टमध्ये दिसत होते पण अचानक तिने ते सर्व फोटो डिलीट केले आहे. मात्र काही फोटो आहेत तसेच आहेत. या कृत्यामुळे नागा चैतन्य नक्कीच दुखावला असेल. मात्र समंथा च्या बाजूने विचार करता तिला यापूर्वीच्या आठवणींना थारा अजिबातच द्यायचा नाहीये असं या कृत्यातून स्पष्ट होते.
घटस्फोट नंतर समंथा मनःशांतीसाठी ऋषिकेश, बद्रीनाथ धाम अशा स्थळांना भेट दिली.